आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

चाणक्य नीती


आपल्या सवयी, हाव भाव आणि स्वभाव यावरूनच आपले घर, नातेवाईक आणि समाजातील स्थान ठरत असते. काही लोक असे असतात की ते घरी असू द्या की ऑफिसात, मित्रांमध्ये असू द्या की नातेवाईकांत, त्यांना सर्वत्र मानसन्मान मिळते. काही लोकांना मात्र सतत अपमान सहन करावा लागतो. आपल्याशी लोकांनी अपमानास्पदरीत्या वागवं, असे कोणालाही वाटत नसते.

घर आणि समाजात आपल्याला मानसन्मान पाहिजे असेल तर आपली वर्तणूक सगळ्यांशी चांगली पाहिजे. ध्यानात ठेवा की कोणत्याही माणसाबद्दल बोलताना चुकूनही काही अपमानास्पद किंवा कटू शब्द बोलू नका. आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार फुलांचा सुगंध केवळ वा-याच्या दिशेनेच दरवळतो, तर चांगल्या माणसाच्या चांगुलपणाचा सुगंध हा सर्व दिशांत दरवळतो.

माणसातील चांगुलपणच त्याला सर्व ठिकाणी घर, नातेवाईक, समाज आणि मित्रांत आदर सन्मान मिळवून देते. जो माणूस सर्वांच्या कल्याणाचा विचार करतो त्याच्याविषयी सर्वांनाच आदर वाटू लागतो. सर्वांच्या कल्याणासाठी काम करणा-याला विशेष स्थान मिळते.

जो माणूस स्वतच्या स्वार्थासाठी दुस-यांना त्रास देतो, राष्टÑहिताचे काम करत नाही, सतत वाईटाच्या संगतीत राहतो, त्याला मान सन्मान मिळणे शक्य नाही. त्यामुळे आपण आपल्या सवयी, स्वभाव यांची घडण अशा रीतीने केली पाहिजे की ज्यामुळे इतरांना त्रास होणार नाही.

No comments:

Post a Comment