कटू सत्य 
         आपण जेव्हां तरुण असतो , तेव्हां आपल्या भोवती मित्र मंडळींचा  घोळका असतो. आपल वय जस जस वाढत जाते , तशी या मित्रांची संख्या कमी होत जाते. जर कोणा  व्यक्तीचा  मृत्यू  झाल्यावर  त्याबद्दल खरोखर  दु:ख वाटून अश्रू   ढाळणारी   माणस   असतील तर ती व्यक्ती भाग्यवानच म्हटली पाहिजे. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात आपण आपल्या आयुष्यातून या नुसत्या परिचितांना वजा करून टाकायचे  ठरवल  आणि केवळ ख-या ख-या , सच्चा दिलाच्या मित्रांनाच  तेव्हढेच  ठेवायचे ठरवल , तर मला वाटत, ती संख्या काही फार मोठी असणार नाही.कदाचित ती संख्या केवळ एकेरी    आकड्याची   असू शकेल. 
   सुधा मूर्तींच्या "पुण्यभूमी भारत " या पुस्तकातून