आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

कटू सत्य

कटू सत्य

आपण जेव्हां तरुण असतो , तेव्हां आपल्या भोवती मित्र मंडळींचा घोळका असतो. आपल वय जस जस वाढत जाते , तशी या मित्रांची संख्या कमी होत जाते. जर कोणा व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याबद्दल खरोखर दु:ख वाटून अश्रू ढाळणारी माणस असतील तर ती व्यक्ती भाग्यवानच म्हटली पाहिजे. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात आपण आपल्या आयुष्यातून या नुसत्या परिचितांना वजा करून टाकायचे ठरवल आणि केवळ ख-या ख-या , सच्चा दिलाच्या मित्रांनाच तेव्हढेच ठेवायचे ठरवल , तर मला वाटत, ती संख्या काही फार मोठी असणार नाही.कदाचित ती संख्या केवळ एकेरी आकड्याची असू शकेल.

सुधा मूर्तींच्या "पुण्यभूमी भारत " या पुस्तकातून

No comments:

Post a Comment