आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

कै. वामनराव पै यांची शिकवण

आपणास माहित आहे काय की नुकतेच निधन पावलेले श्री. वामनराव पै हे  सेवानिवॄत्त शासकीय नोकर होते. ते मंत्रालयातून उपसचिव म्हणून सेवानिवॄत्त झाले.

त्यानी प्रगतीच्या सांगितलेल्या खालील सात पाय-यानी आपण आपली वाटचाल करू या व स्वतःची व देशाची प्रगती करू या.

1) कष्ट
2) कर्तव्य
3) कौशल्य
4) कल्पकता
5) कौतुक
6) करूणा
7) कृतज्ञता

कै. वामनराव पै यानी सांगितलेली प्रार्थना ः

 ईश्वरा, सर्वाना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वाना सुखात, आनंदात ठेव, सर्वांचे भले कर

No comments:

Post a Comment