आजचा सुविचार २९ जून २०२०

भावनेच्या ओलाव्यात असतो.कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही आपोआप जोडलं जातं . खरी आपुलकी, माया हि दुर्मिळ असते. हे लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो.

मंत्रालयातील आग- सेवा अभिलेखांची पुनर्बांधणी

21 जुन 2012 रोजी मंत्रालयात लागलेल्या आगीत सामान्य प्रशासन विभागातील आस्थापना व रोख शाखेतील अभिलेख व कागदपत्रे नष्ट झाली आहेत.सदर विभागातील अधिकारी व कर्मचा-यांचे सेवा अभिलेख व वैयक्तिक नस्ती देखील नष्ट झाल्या आहेत. सेवा अभिलेख व वैयक्तिक नस्तींची पुनर्बांधणी करण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने 12 जुलै 2012 रोजी एक परिपत्रक काढले आहे.सदर परिपत्रक या ब्लॉग  वर  "नुकतीच निर्गमित केलेली परिपत्रके व शासन निर्णय" या शिर्षकाखालील पत्रकातील अनुक्रमांक 34 वर उपलब्ध आहे. संबंधितानी ते जरूर तर डाऊनलोड करून घ्यावे.

No comments:

Post a Comment